1मे महाराष्ट्र दिनमहाराष्ट्र दिन विशेष

संकलन : सी जी कोयलारे सर 
प्रसारण: भरत घासले 
महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे, १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुटी असते. हा मराठी माणसे मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते.
१ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो.
महाराष्ट्र दिनाचा इतिहास
२१ नोव्हेंबर इ.स.१९५६ दिवशी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे मराठी माणसे चिडली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. या संगठनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येण्याचे नियोजन झाले.
त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाउंटनकडे जमला. मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र अढळ सत्याग्रहीं मुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. गोळीबारात झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ आंदोलक हुतात्मे झाले.
या हुतात्म्यांच्या बलिदानापुढे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन १ मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. त्यानंतर इ.स. १९६५मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली.
*महाराष्ट्र राज्यासाठी झालेल्या हुतात्म्यांना विनम्र अभिवादन*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*🔵हुतात्म्यांची नावे*🔵
२१ नोव्हेंबर इ. स. १९५५ चे हुतात्मे १] सिताराम बनाजी पवार २] जोसेफ डेव्हिड पेजारकर ३] चिमणलाल डी. शेठ ४] भास्कर नारायण कामतेकर ५] रामचंद्र सेवाराम ६] शंकर खोटे ७] धर्माजी गंगाराम नागवेकर ८] रामचंद्र लक्ष्मण जाधव ९] के. जे. झेवियर १०] पी. एस. जॉन ११] शरद जी. वाणी १२] वेदीसिंग १३] रामचंद्र भाटीया १४] गंगाराम गुणाजी १५] गजानन ऊर्फ बंडू गोखले १६] निवृत्ती विठोबा मोरे १७] आत्माराम पुरुषोत्तम पानवलकर १८] बालप्पा मुतण्णा कामाठी १९] धोंडू लक्ष्मण पारडूले २०] भाऊ सखाराम कदम २१] यशवंत बाबाजी भगत २२] गोविंद बाबूराव जोगल २३] पांडूरंग धोंडू धाडवे २४] गोपाळ चिमाजी कोरडे २५] पांडूरंग बाबाजी जाधव २६] बाबू हरी दाते २७] अनुप माहावीर २८] विनायक पांचाळ २९] सिताराम गणपत म्हादे ३०] सुभाष भिवा बोरकर ३१] गणपत रामा तानकर ३२] सिताराम गयादीन ३३] गोरखनाथ रावजी जगताप ३४] महमद अली ३५] तुळशीराम पुंजाजी बेलसरे ३६] देवाजी सखाराम पाटील ३७] शामलाल जेठानंद ३८] सदाशिव महादेव भोसले ३९] भिकाजी पांडूरंग रंगाटे ४०] वासुदेव सुर्याजी मांजरेकर ४१] भिकाजी बाबू बांबरकर ४२] सखाराम श्रीपत ढमाले ४३] नरेंद्र नारायण प्रधान ४४] शंकर गोपाल कुष्टे ४५] दत्ताराम कृष्णा सावंत ४६] बबन बापू भरगुडे ४७] विष्णू सखाराम बने ४८] सिताराम धोंडू राडये ४९] तुकाराम धोंडू शिंदे ५०] विठ्ठल गंगाराम मोरे ५१] रामा लखन विंदा ५२] एडवीन आमब्रोझ साळवी ५३] बाबा महादू सावंत ५४] वसंत द्वारकानाथ कन्याळकर ५५] विठ्ठल दौलत साळुंखे ५६] रामनाथ पांडूरंग अमृते ५७] परशुराम अंबाजी देसाई ५८] घनश्याम बाबू कोलार ५९] धोंडू रामकृष्ण सुतार ६०] मुनीमजी बलदेव पांडे ६१] मारुती विठोबा म्हस्के ६२] भाऊ कोंडीबा भास्कर ६३] धोंडो राघो पुजारी ६४] ह्रुदयसिंग दारजेसिंग ६५] पांडू माहादू अवरीरकर ६६] शंकर विठोबा राणे ६७] विजयकुमार सदाशिव भडेकर ६८] कृष्णाजी गणू शिंदे ६९] रामचंद्र विठ्ठल चौगुले ७०] धोंडू भागू जाधव ७१] रघुनाथ सखाराम बीनगुडे ७२] काशीनाथ गोविंद चिंदरकर ७३] करपैया किरमल देवेंद्र ७४] चुलाराम मुंबराज ७५] बालमोहन ७६] अनंता ७७] गंगाराम विष्णू गुरव ७८] रत्नु गोंदिवरे ७९] सय्यद कासम ८०] भिकाजी दाजी ८१] अनंत गोलतकर ८२] किसन वीरकर ८३] सुखलाल रामलाल बंसकर ८४] पांडूरंग विष्णू वाळके ८५] फुलवरी मगरु ८६] गुलाब कृष्णा खवळे ८७] बाबूराव देवदास पाटील ८८] लक्ष्मण नरहरी थोरात ८९] ठमाबाई विठ्ठल सूर्यभान ९०] गणपत रामा भुते ९१] मुनशी वझीऱअली ९२] दौलतराम मथुरादास ९३] विठ्ठल नारायण चव्हाण ९४] देवजी शिवन राठोड ९५] रावजीभाई डोसाभाई पटेल ९६] होरमसजी करसेटजी ९७] गिरधर हेमचंद लोहार ९८] सत्तू खंडू वाईकर ९९] गणपत श्रीधर जोशी १००] माधव राजाराम तुरे(बेलदार) १०१] मारुती बेन्नाळकर १०२]  मधूकर बापू बांदेकर १०३] लक्ष्मण गोविंद गावडे १०४] महादेव बारीगडी १०५] कमलाबाई मोहित
*महाराष्ट्र राज्याचे नाव 'महाराष्ट्र' कसे ठरवण्यात आले?माहिती आहे काय?*
महाराष्ट्र हे देशनाम इसवी सनाच्या चौथ्या शतकापासून आढळते.सागर (मध्यप्रदेश) जिल्ह्यातील 'एरण'या गावी सापडलेल्या स्तंभलेखात शकवंशी महाक्षत्रप राजन श्रीधरवर्मा याचा आरक्षिक (रक्षण करणारा) सत्यनाग याने 'एरण' येथे झालेल्या घोर युद्धात कामी आलेल्या नाग सैनिकांच्या स्मृत्यर्थ एक यष्टी उभारल्याचा उल्लेख आहे. त्या लेखात सत्यनागाला 'माहाराष्ट्र' असे म्हटले आहे.

महाराष्ट्र म्हणजे मोठे राष्ट्र. महारथी म्हणजे मोठा योद्धा यावरून महारट्ट-महरट्ट-'महाराष्ट्र ' या देश् वाचक नामाचे वेगवेगळे अर्थ संशोधकांनी ध्वनित केलेले आहेत.

(१) मोल्सवर्थ शब्दकोशाच्या प्रस्तावनेत डॉ.जॉन विल्सन यांनी महारांचे राष्ट्र ते ,महाराष्ट्र असे प्रतिपादन केले आहे.महार हेच या देशातील मूळ रहिवासी, प्रथम वसाहतकार . डॉ.ओपर्त (ट) यांनीही या मतास दुजोरा दिलेला आहे. त्यांच्या मताने महाराष्ट्राचे जुने नाव मल्लराष्ट्र. मल्ल म्हणजेच मार. मार-महार-म्हारराष्ट्र-महाराष्ट्र . डॉ.श्रीधर व्यंकटेश केतकर यांनीहा त्यांच्या प्राचीन महाराष्ट्र -शातवाहन पर्व या ग्रंथात याच मताचा पाठपुरावा केलेला आहे.

(२) डॉ.भांडारकर यांनी 'राष्टिक'चे मूळ रूप राष्ट्रिक असून हे बहुधा महाराष्ट्रातील असावे असा तर्क केलेला आहे. भोज जसा महाभोज तसे राष्ट्रिक महाराष्ट्रिक बनले. महारठीचा देश महारठ्ठ आणि याचे संस्कृत रूप महाराष्ट्र होय.

(३) महारथी-महरट्ट-मरहट्ट-यावरून महाराष्ट्र अशीही व्युत्पत्ती देता येण्यासारखी आहे.

(४) महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे यांच्या प्रतिपादनानुसार 'महान राष्ट्र ते महाराष्ट्र' . महाकान्तार. महाटवीच्या धर्तीवर महा-राष्ट्र .

(५) बा.अ. भिडे यांच्या विवेचनानुसार दक्षिणेस आर्यांच्या विस्तृत,सलग,व व्यवस्थित अशा वसाहती निर्माण होऊन त्यांना 'राष्ट्र' ही संज्ञा प्राप्त झाली होती.यातील राष्ट्रिक यांनी 'लहान-लहान राष्ट्रांचे एक महाराष्ट्र बनविले.

(६) शंकर बा. जोशी यांनी महाराष्ट्र हे नाव महरट्ट' या कन्नड शब्दावरून आले असल्याचे सुचविले आहे. त्यांच्या मताने मर म्हणजे झाड व हट्ट म्हणजे धनगर. हाती लोकांचा झाडीयुक्त देश म्हणजे महरट्ट.